131 Views

*धडा*
✍️ २७६९
समाजात तुम्ही कितीही चांगुलपणा , श्रेष्ठत्व मिळवलं तरी त्याच्याशी कुणाला कांहीही घेणं देणं नसतं.प्रत्येक ठिकाणी फक्त वैयक्तिक स्वार्थ व नफा तोट्याचाच हिशोब बघितला जातो.
अनेक ठिकाणी तर तुमच्या श्रेष्ठत्वावर जळणारे व तुमच्या मागे तुम्हाला शिव्या घालणारेच भरपूर असतात.
तुमच्या श्रेष्ठत्वाचं कौतुक फक जन्मदात्री आई आणि सद्गुरूंनांच असतं.
ईश्वर सुध्दा त्याच्या खडतर परीक्षेत पास झाल्यावर आपल्या भक्तांचे लाड पुरवतोच.
त्यामुळे ज्यांना आयुष्यात पुढे जायचे आहे आणि मोठे नाव कमावून , नरदेहाचे सार्थक करायचे आहे , त्यांनी सतत पाण्याच्या प्रवाहासारखे पुढे पुढे गेले पाहिजे.
हरी ॐ
*विनोदकुमार महाजन*
