109 Views

सुख मिळो वा दु:ख
अमृत मिळो वा विष
आनंद मिळो वा क्लेश
मान मिळो वा अपमान
स्वर्ग मिळो वा नर्क
सद्गुरु चरणांपाशी नेहमी
लीन , निगर्वी , समर्पित
राहीले पाहिजे
तरच स्वर्गीय देवीदेवतांशी निरंतर नाते जोडले जाते

स्वर्गीय सुख नको
धन वैभव नको
ऐश्वर्य नको
मान-सम्मान नको
यश किर्ती नको
मोक्ष ही नको
पवित्र सद्गुरु चरणकमलांशी जन्मोजन्मी एकरूपता
हेच एकमेव वरदान हवे

निरपेक्ष , पवित्र प्रेम हीच
अंतिम यशाची गुरू किल्ली आहे

विनोदकुमार महाजन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!